मनाच्या आरोग्याची काळजी घ्या

 मनाच्या आरोग्याची काळजी घ्या / TAKE CARE OF YOUR MENTAL HEALTH

           आपल्याकडे जगातील सर्व संपत्ती असेल, परंतु आपल्या मनाचे स्वास्थ्य जर ठीक नसेल तर आपल्याला त्या संपत्तीमध्ये आनंद मिळणार नाही. आपलं मन जर आपल्या ताब्यात राहत नसेल तर ते दुःखाचं कारण ठरू शकते. सध्या आपलं मन हे आपल्या ताब्यात न राहण्याचे मुख्य कारण हे आपल्या मनावर मोबाईलचं झालेलं अतिक्रमण हे आहे. हि गोष्ट किती अपायकारक आहे हे सर्वांना माहित आहे, समजत आहे. मोबाईल चा अतिरिक्त वापर थांबवला पहिजेन परंतू ही कृती करायला मात्र कोणीही तयार नाही. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचं कौशल्य जर नसेल तर हेच आपलं आयुष्य उद्ध्वस्त सुध्दा करू शकते.




        मोबाईल च्या अतिरिक्त वापर हा प्रामुख्याने सोशल मीडिया वरील विविध प्रकारचे रिल्स,फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट पाहण्या साठी होतो.लगतच्या काही दिवसांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात ही गोष्ट निदर्शनास आली आहे की जगामध्ये सर्वाधिक इंटरनेटचा वापर हा सोशल मीडिया वरील पोस्ट रील पाहण्यासाठी होत आहे.ह्या मोबाईल च्या स्क्रीन समोर तासन् तास हे अक्षरशः वाया घालवले जातात. ह्या मोबाईल च्या व्यसनाचे शिकार प्रौढ वयोगट बरोबरच लहान वयोगतील मूल सुद्धा याची अधीन होत आहेत.मुलांच्या पालक वर्गाकडून ह्या गोष्टीला खत पाणी घातले जात असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते. ह्याचे मुख्य कारण पालकांकडे मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही हे सांगितले जाते परंतु ये योग्य नाही कारण पालकांच्या विविध गोष्टीचे अनुकरण त्यांची मुलं करत असतात.त्यामुळे मुलांना पुरेसा योग्य वेळ देणं हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे.त्याच बरोबरीने मुलानं समोर मोबाईल वापर टाळणे हे देखील तितकेच गरजेचे आहे.

    मोबाईल च्या अतिरेकी वापराचा परिणाम वाचणं वरती झालेला आपणास दिसतो आहे.वाचन हे माणसाची वैचारिक शक्ती वाढवण्याचे कार्य करत असते.ज्याचा फायदा माणसाला त्याच्या दैनंदिन आयुष्यात होत असतो.वैचारिक प्रगल्भ समाज हा सामाजिक उन्नती साठी गरजेचा असतो.त्यामुळे वाचलं तर वाचाल असे म्हणले जाते.वैचारिक प्रगल्भता ही मानसिक स्वास्थ साठी कारणीभूत ठरत असते. त्यामूळे मानसिक अयोग्य सुधारणा करण्यात यावी यासाठी वाचन वाढवणे गरजेचे आहे.

       आपलं मन हे विचारांचा कारखाना आहे. दररोज किमान साठ ते सत्तर हजार विचार मनात तयार होतात. या विचारांवर जर आपलं नियंत्रण नसेल तर आपल्याला क्षणाक्षणाला दुःखाचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला मनाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर संयम वाढवायला शिकावं लागेल. म्हणजेच ज्या चुकीच्या सवयी लागल्या आहेत त्या सवयींपासून स्वतःला थोडं थोडं बाजुला घेवून जाणे, म्हणजे जर मोबाईलचं खूप व्यसन लागलं असेल तर मोबाईल फक्त अशाच वेळेस सोबत ठेवा जिथं अत्यंत गरजेचे आहे बाकीच्या वेळेत तुम्ही तो मोबाईल कपाटात ठेवा किंवा जिथं सहज मोबाईल हा दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. यांमुळे थोडं फार का होईना मोबाईलचं व्यसन कमी होण्यास मदत होईल तसेच मनाचं आरोग्य यांमुळे चांगले राहायला मदत होईल कारण यांमुळे जागरुकता वाढेल. यापुढे ही कोणत्याच गोष्टीचं आपल्या मनावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचे आहे.

          मनाच्या शांती शिवाय कुठल्याच गोष्टी- ला खूप जास्त महत्त्व देऊ नका. कारण मनःशांती नसेल तर कुठलाच व्यक्ती त्याच्या वयक्तिक आयुष्यात किंवा त्याच्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होवू शकत नाही,तसेच मनाचा गुलाम होऊ नका कारण गुलामगिरी व्यक्तीला लाचार बनवत असते. आपल्याला लाचार न होता मनाचा राजा व्हायचे आहे. म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टी पासून मनाला प्रत्येक सवाई पासून थोडं थोडं अलिप्त राहण्याची कला शिकवायची आहे. यामुळे मन नियंत्रणात यायला मदत होईल आणि मानसिक स्वास्थ्य पण चांगले राहील त्यामुळे व्यक्ती त्याच्या जीवना मध्ये मानसिक आरोग्य निरोगी ठेवेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मकर संक्रांती 2024 मराठी माहिती | makar sankranti 2024 marathi mahiti

आनंदाची गुरुकिल्ली